भारताची 1 इंच जमीनही कोणी घेऊ शकत नाही- नरेंद्र मोदी, भारत-चीन संघर्षावर प्रश्नांचा खुलासा

Modi-on-Indo-china-faceoff
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय पार पडली असून या  बैठकीत सर्व प्रथम गलवान खोऱ्यातील शाहिद झालेल्या भारतीय जवावांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. काँगेस कडून सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, टीएमसीकडून ममता बॅनर्जी यांच्या सह 20 प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आम आदमी पार्टी आणि आरजेडी पक्ष उपस्थित नव्हते. या वेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी चीनला धडा शिकवावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिले.

शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. नवीन बनलेल्या सुविधांमुळे विशेष करुन एलएसीजवळ आपल्या सैन्याची पेट्रोलिंग क्षमता वाढली आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर पहिले आपली नजर जात नव्हती त्याठिकाणी आपले जवान चांगल्यारितीने मॉनिटर करु शकत आहेत.

भारत कधीही कोणाच्या दबावाखाली येणार नाही. देशाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहोत. निश्चितपणे चीनद्वारे एलएसीवर जे काही सुरु आहे त्यामुळे देशात आक्रोश आहे. हीच भावना सर्वपक्षीय बैठकीत आपल्या चर्चेदरम्यान पाहायला मिळाली असं नरेंद्र मोदी म्हणाले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.