मुंबई, ११ एप्रिल: महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असून राज्यातील बहुतांश
जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून भीषण उकाडा जाणवत आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असून
तापमान झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यांतील तापमान विक्रमी पन्नाशीच्या दिशेने
झेपावत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गुरुवारी नंदुरबारमध्ये
राज्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला आणि जळगावसारख्या भागांमध्येही
पारा ४४
अंशांच्या घरात
पोहोचला आहे. तापलेल्या हवामानामुळे दुपारी रस्ते ओस पडत आहेत, नागरिक गरजेव्यतिरिक्त घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.
हवामान खात्याने
यासंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता अशीच राहण्याची
शक्यता असून, काही भागांमध्ये
अवकाळी पावसाची
शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी
अत्यावश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात उन्हामुळे लहान
मुले,
वृद्ध व आजारी व्यक्तींना जास्त त्रास होत असून, दवाखान्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे घेऊन दाखल होणाऱ्यांची
संख्याही वाढत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी शक्य तितका थेट उन्हात जाणे टाळण्याचा आणि
पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
उष्णतेपासून बचावासाठी सविस्तर उपाय
Home remedies to protect against heat
१.
पाणी आणि द्रवपदार्थांचे भरपूर सेवन करा:
दिवसभरात
8-10 ग्लास पाणी अनिवार्य प्या.
घरगुती
सरबत (लिंबूपाणी, बेल सरबत, आंब्याचे पन्हं, ताक) यांचा वापर करा.
गॅसवाले, साखरयुक्त, कोल्डड्रिंक्स
टाळा – ते तात्पुरती थंडी देतात पण डिहायड्रेशन वाढवतात.
२.
हलके,
सुती आणि सैलसर कपडे वापरा:
पांढरे
किंवा फिकट रंगाचे कपडे उन्हाचे प्रतिबिंब परावर्तित करतात.
टाईट
आणि सिंथेटिक कपड्यांमुळे उष्णता अडकते – ते टाळा.
शक्य
असल्यास टोपी, छत्री, गॉगल्स वापरा.
३.
दुपारच्या वेळेत (११ ते ४) बाहेर जाणं टाळा:
ही
वेळ ‘घातक उन्हाची वेळ’ मानली जाते.
अत्यावश्यक
असेल तर सावलीचा वापर करा किंवा थेट सूर्यप्रकाश टाळा.
४.
घरातील तापमान कमी ठेवण्याचे उपाय करा:
खिडक्या/दरवाजे
दुपारी बंद ठेवा, संध्याकाळी
उघडा.
पांढऱ्या
किंवा गडद रंगाच्या पडद्यांनी सूर्यप्रकाश अडवा.
घरात
शक्य असल्यास पंखा, कुलर, एसी यांचा वापर करा.
जमिनीवर
पाणी शिंपडल्यानेही थोडं गारवा निर्माण होतो.
५.
डाएटमध्ये थंड, हलकी व पचनास सोपी आहार
घ्या:
फळं:
कलिंगड,
खरबूज, संत्रं, केळी, द्राक्षं.
भाज्या:
दुधी,
भोपळा, टोमॅटो, काकडी.
मसालेदार, जड आणि तेलकट पदार्थ टाळा.
६.
लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना
विशेष काळजी द्या:
यांचं
शरीर उष्णतेच्या बदलाशी सहज जुळवून घेऊ शकत नाही.
वेळच्या
वेळी पाणी पाजणे, थंड जागी
ठेवणे आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या
लक्षणांवर लवकर लक्ष देणे गरजेचे आहे.
७.
उष्माघाताची (Heat Stroke) लक्षणे ओळखा:
तीव्र
डोकेदुखी,
घाम न येणे, अशक्तपणा, उलटी, चक्कर.
अशा
वेळी लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा, पाणी
द्या,
व थंड जागी ठेवा.
८.
कामाच्या ठिकाणी संरक्षण करा:
बांधकाम
मजूर,
शेतकरी, ट्रॅफिक
पोलीस अशा व्यक्तींना सावली, पाणी
आणि थोडी विश्रांती देणे अत्यावश्यक आहे.
सरकार
किंवा संस्थांनी या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
९.
प्रत्येक घरात ‘घरगुती प्राथमिक उपचार’ तयार ठेवा:
ORS, थंड पाणी, गीला
टॉवेल,
पंखा, लिंबूपाणी
तयार ठेवा.
गरज
पडल्यास लगेचच उपयोगात आणता येईल.